डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानीवरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. ही घटना ऐकून अतिशय दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. त्यांना…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2026
https://prahaar.in/2026/05/18/mumbai-ahmedabad-national-highway-resulting-in-the-deaths-of-three-to-four-people/
डहाणू तालुक्यातील बापू गाव (खडकीपाडा) येथील बाळाराम जयराम दांडेकर यांचा साखरपुडा धानोरी येथे आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाडी ट्रकमधून जात असताना मुलीच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अपघात झाला आणि दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
साखरपुड्यानंतर आनंदानं घरी चाललेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रक आणि भरधाव कंटेनरची धडक झाली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात ही घटना घडली. या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती आहे.
.
.#prahaarnewsline #prahaarshorts… pic.twitter.com/rg30qY8mVU— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) May 18, 2026
https://prahaar.in/2026/05/09/satpati-will-get-global-recognition/
अनेक प्रवासी ट्रकखाली अडकले होते. सुरुवातीला सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालय तसेच वापी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे साखरपुड्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
https://prahaar.in/2026/05/02/an-accident-occurred-on-the-way-home-and-a-friend-was-killed-then-another-person-made-a-shocking-decision-too/
मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानोरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेला हा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. ही घटना ऐकून मला अतिशय दुःख झाले. अपघातात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच या अत्यंत कठीण प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्दैवी घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मृतांची नावे
सुरेखा सना लाखाण
पांडू गणपत लाखाण
कलू रोहिदास लाखाण
सुनील अर्जुन धोडकर
चिमा गोविंद बहेडा
नानीमा विठ्ठल धोडकर
सारिका संतोष लाखाण
आयुष विनायक लाखाण
सागर नामदेव थोडे
वंदना शिवराम वळवी
सलोनी शिवराम वळवी
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दोन नागरिकांच्या नावांची पडताळणी प्रशासनाकडून सुरू आहे