पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय
मुंबई : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विभागासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, विभागाच्या सर्व बैठका आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत.
https://prahaar.in/2026/05/12/big-news-neet-2026-exam-cancelled/
इंधनावरील खर्च कमी करणे आणि परकीय चलनाची बचत करणे या हेतूने मंत्री नितेश राणे यांनी हा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या मुंबईतील मंत्रालय किंवा इतर ठिकाणच्या बैठकांसाठी अधिकाऱ्यांना प्रवास करावा लागणार नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कामकाज उरकण्यावर भर दिला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी विभागात तातडीने सुरू करण्यात आली असून, यामुळे इंधन बचतीसोबतच प्रशासकीय कामाचा वेगही वाढणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर भर