मुंबई : महाराष्ट्रात होणारे हवामान बदल दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. कुठे पाऊस पडतोय तर कुठे उष्णेतेचा कहर माजला आहे. हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या बातमीनुसार ७ मे ला गुरुवारी काही भागात अवकाळी पाऊस, आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे यामुळे काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह सर्वच जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ७२ तास हवेतील आद्रता प्रचंड वाढणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे.
कोकणात गेल्या काही काळापासून उष्ण आणि दमट हवामानाने नागरिक हैरान झाले आहेत. त्यामुळे कोकणात उकाडा तर राहणारच आहे शिवाय वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/05/07/bmc-news-inquiry-into-four-years-of-work-by-mechanical-and-electrical-departments/
मध्य महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढलेलाच राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमान ४०-४४ अंशापर्यंत जाणार असून, किमान २२-२६ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मराठवाडाचे हवामान
मराठवाड्याला पाऊस चांगलाच झोडपणार असून काही ठिकाणी उष्णतेचा पारा हा चढलेला दिसणार आहे. शिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/05/07/bmc-news-inquiry-into-works-on-eastern-and-western-express-highways-over-the-last-three-years/
विदर्भ
गेल्या काही दिवसात पावसाने विदर्भाला चांगलेच झोडपून निघालं आणि आता हे संकट हळूहळू मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकणात गेलं आहे.
दरम्यान काही दिवस हे असच वातावरण महाराष्ट्रात राहणार असून, नागरिकांनी विजा आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.