मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये काल (४ मे सोमवार) मुंबई विरुद्ध लखनऊचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने लखनऊचा सहा विकेट्स राखून पराभव केला. सामन्यात रोहितच्या आगमनाने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली होती. पण याच सामन्यातील कामगिरीवरून दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराहवर टीका केली आहे. तुम्ही वारंवार नो बॉल टाकू शकत नाही, असे गावसकर बुमराहला उद्देशून म्हणाले.
https://prahaar.in/2026/05/05/bowler-raghu-sharmas-letter-goes-viral-everyone-including-suryakumar-read-the-letter/
नेमकं घडलं काय ?
हा हंगाम बुमराहसाठी फारसा चांगला ठरला नाही. माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. मुंबईच्या गोलंदाजी दरम्यान, १४ व्या षटकात बुमराहच्या एका चेंडुवर हिम्मत सिंग रायन रिकेल्टनच्या हाती झेलबाद झाला होता, पण तो बॉल पंचांनी नो बॉल दिला. यावेळी समालोचन करताना सुनील गावसकर संतापले. गावसकर म्हणाले की, माझा विश्वासच बसत नाही. बुमराह नो बॉल टाकू शकतो. पुढे बोलताना ते म्हणाले, मला पुनहा सांगू नका की बुमराहने नो बॉल टाकला आहे. हे अस्वीकार्ह आहे. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटपटू आहात, तुम्ही एक वेळे वाईड टाकू शकता, पण नो बॉल अजिबात नाही.” यानंतर हिम्मत ने ४० धावांची खेळी केली. या सामन्यात बुमराहने ४ षटकात ४५ धावा दिल्या.