– ‘उबाठा’सोबतच्या ‘गुप्त भेटी’चे वृत्तही फेटाळले
मुंबई : नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, इतिहास आणि लोककथा यांतील फरक ओळखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अधिकृत ऐतिहासिक संदर्भ आणि ग्रंथांमध्ये अशा कोणत्याही प्रसंगाचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
https://prahaar.in/2026/04/25/aap-means-luxurious-aadmi-party-bjp-criticizes-arvind-kejriwal/
दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री गुप्त भेट झाल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर मी ते उघडपणे करेन, आम्हाला लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत जे लपवून ठेवावे लागतील.”