अहमदाबाद : तिलक वर्माची स्फोटक फलंदाजी आणि अश्विनी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, तिलकच्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत पाच विकेट्स गमावून १९९ धावा केल्या. गुजरातचा संघ १५.५ षटकांत केवळ १०० धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. धावांच्या फरकाने मिळवलेला हा मुंबईचा आयपीएलमधील चौथा सर्वात मोठा विजय आहे. तसेच, गुजरातचा संघ आपल्या सर्वात कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याची ही दुसरी वेळ होती..
सलग चार पराभवांनंतर मुंबईचा हा पहिला विजय आहे. या हंगामातील दुसऱ्या विजयासह, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांचा नेट रन रेट देखील सुधारून +०.०६७ झाला आहे. गुजरात सध्या सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
https://prahaar.in/2026/04/17/ipl-2026-mi-vs-pbks-some-tough-decisions-have-to-be-made-hardik-pandya-will-mumbais-internal-dispute-affect-the-game/
गुजरातची सामन्याची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने साई सुदर्शनला (०) गमावले. पुढच्याच षटकात, जोस बटलरच्या (५) रूपाने त्यांना दुसरा धक्का बसला. त्यानंतर, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यांनी २० चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्या, पण ही जोडी तुटल्यानंतर संघ पुन्हा गडबडला. वॉशिंग्टन १७ चेंडूंमध्ये २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर शाहरुख खानने १७ धावांचे योगदान दिले. कर्णधार शुभमन गिलने १४ धावांची खेळी केली. मुंबईसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या अश्विनी कुमारने २४ धावांत चार बळी घेतले, तर गझनफर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
https://prahaar.in/2026/04/16/mumbai-indians-suffer-fourth-consecutive-defeat-punjab-wins-kings-become-ipl-toppers/
यापूर्वी, गुजरातविरुद्ध मुंबईची सुरुवात खराब झाली होती, रबाडाने पॉवरप्लेमध्येच मुंबईला तीन बळी मिळवून दिले होते. रबाडाने क्विंटन डी कॉक (१३), दानिश मालेवार (२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१५) यांना बाद करून मुंबईचा डाव सावरला होता. त्यानंतर तिलकने नमन धीरसोबत मिळून मुंबईचा डाव सावरला. या दोन फलंदाजांनी ४० चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. नमन धीर बाद झाल्यानंतर, तिलक आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी मुंबईसाठी एक मोठी भागीदारी रचली. त्यांनी ३८ चेंडूंमध्ये पाचव्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या, ज्यात तिलकचे योगदान सर्वाधिक होते. हार्दिक बाद झाला, पण तिलकने आपली विकेट टिकवून ठेवली.