मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांनुसार, सामन्यादरम्यान केवळ संघाच्या रोस्टरवर म्हणजेच क्रिकेटपटूंच्या यादीत असलेल्या क्रिकेटपटूंनाच मैदानावर प्रवेश करण्याची किंवा फिरण्याची परवानगी असेल.
या सदस्यांना आता मैदानावर येण्याची परवानगी नाही :
नियमांचे पालन न केल्यास संघ व क्रिकेटपटूंच्या अडचणी वाढणार :
संघ व्यवस्थापनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, सामन्यादरम्यान बदली क्रिकेटपटूंच्या अनावश्यक हालचालींवर कठोरपणे बंदी घालण्यात येईल. सीमारेषा आणि एलईडी जाहिरात फलक यांच्यामध्ये केवळ मर्यादित क्रिकेटपटूंनाच परवानगी दिली जाईल.
https://prahaar.in/2026/04/09/bangladesh-finally-relents-bangladesh-cricket-board-invites-india/
बीसीसीआयकडून नियम अजून कडक होणार :
आयपीएल २०२६ दरम्यान बीसीसीआयने हा निर्णय का घेतला आहे, याचे कारण सध्या अस्पष्ट आहे. असे मानले जाते की, सामन्यादरम्यान शिस्त राखणे, अनावश्यक गर्दी आणि व्यत्यय कमी करणे, तसेच खेळाचा वेग सुधारणे यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.