‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार लाभ
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी “बंगला शस्य बीमा” योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी ३५० कोटी निधी जारी करण्याची घोषणा केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला अत्यंत आनंद होत आहे की ‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत आम्ही आता ९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ३५० कोटी जमा करत आहोत.
त्यांनी स्पष्ट केले की, ही मदत खरीप हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जात आहे.
https://prahaar.in/2025/01/08/focus-on-creating-a-patient-centric-health-system-says-chief-minister-devendra-fadnavis/
आमच्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत, कारण राज्य सरकार सर्व पिकांसाठी, ज्यामध्ये बटाटे आणि ऊस यांचा समावेश आहे, संपूर्ण विमा प्रीमियम भरते, असेही त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून, राज्य सरकारने केवळ ‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत एकूण ३,५६२ कोटींची मदत १.१२ कोटी शेतकऱ्यांना दिली आहे. आम्ही नेहमीच बंगालमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहू, असेही त्यांनी नमूद केले.