Share

दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया

गयाना (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात रविवारी भारतीय संघाची फलंदाजी चांगली झाली नाही. फलंदाजीत टीम इंडिया कमी पडल्याची प्रतिक्रिया भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिली.

हार्दिक म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे, तर आमची फलंदाजी चांगली झाली नाही. आम्ही आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. १६०+ किंवा १७० धावा या त्या खेळपट्टीवर खूप महत्त्वाच्या होत्या. वेस्ट इंडिजचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, त्यामुळे फिरकीपटूंना गोलंदाजी करणे खूप कठीण होऊन बसले. निकोलस पूरनने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या बाजूने सामना फिरला. मात्र, तो बाद होताच युजवेंद्र चहल आणि रवि बिश्नोईने भारताला सामन्यात परत आणले. पण शेवटच्या जोडीने विंडीजला विजय मिळवून दिला. जर याच ठिकाणी १७० धावसंख्या असती तर आम्ही कदाचित सामना जिंकला असता.

हार्दिक पुढे म्हणाला की, सध्याच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये पहिल्या सात फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभी करण्याची जबाबदारी आहे आणि ते तसे करतील असा विश्वास ठेवायला हवा. मात्र, फलंदाजांनी देखील संधीचा फायदा उठवणे गरजेचे असल्याचे पंड्या म्हणाला.

हार्दिकने तिलक वर्माचे कौतुक केले. तिलकच्या रुपाने डावखुरा फलंदाज चौथ्या क्रमांकावर येण्याने संघाला विविधता मिळते. हा त्याचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना होता असे वाटत नाही. खेळपट्टीचा अंदाज घेऊन जर फलंदाजांनी फलंदाजी केली असती, तर आज ही वेळ आली नसती.

Recent Posts

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

23 minutes ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

26 minutes ago

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…

27 minutes ago

Gold rate: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…

1 hour ago

PBKS vs DC, IPL 2025: धरमशालामध्ये पाऊस थांबला, पंजाब किंग्सची पहिली फलंदाजी

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…

1 hour ago

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…

2 hours ago