Home ताज्या घडामोडी जयंत पाटलांकडून नव्या राज्यपालांचं स्वागत तर कोश्यारींवर टीका

जयंत पाटलांकडून नव्या राज्यपालांचं स्वागत तर कोश्यारींवर टीका

0
जयंत पाटलांकडून नव्या राज्यपालांचं स्वागत तर कोश्यारींवर टीका

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत नवीन राज्यपालांचं स्वागत तर मावळत्या राज्यपालांवर टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.

नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा-सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो! अशा आशयाचं ट्वीट जयंत पाटील यांनी केलंय.