Home महाराष्ट्र कोकण रेशन दुकानावरील मोफत धान्य नेमके जाते कुठे?

रेशन दुकानावरील मोफत धान्य नेमके जाते कुठे?

रेशन दुकानावरील मोफत धान्य नेमके जाते कुठे?

रत्नागिरी (वार्ताहर) : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा मुकाबला करण्याबरोबरच लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना चार घास खात होता. मात्र हे धान्य गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना मिळाले नसल्याची ओरड सुरू आहे. शासनाकडून येणारे हे धान्य नेमके जाते कुठे? याचा शोध आता घेतला जात आहे.

कोरोनाच्या काळात मोफत धान्य रेशन दुकानावर दिले जाणार होते. हे धान्य अनेक गावांत तसेच रेशनकार्डावर अनेकांना मिळाले नसल्याचे पुढे आले असून काही रेशन दुकानांवर बायोमॅट्रीक पद्धतीने या धान्याची विक्रीच केली जात नसल्याचेही समोर आले आहे. धान्य अगोदर दिले जाते आणि बायोमॅट्रीक (अंगठा) नंतर घेतला जातो. पण रेशनच दिले जात नाही, असे घडत असल्याने त्याचा शोध घेणे सरकारला क्रमप्राप्त झाले आहे.

सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यामुळे गोडावून मात्र तुडुंब भरली आहेत. पण प्रत्यक्षात रेशनदुकानावर हे धान्यच उपलब्ध नसते. कधी रेशन दुकानच नियमित वेळेत उघडी नसतात. याची तपासणी अधिकारी करत नाहीत. जरी अधिकारी तपासणी करत असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी कमी असल्याने त्याचा फायदा रेशन दुकानदारांकडून घेतला जात आहे. अनेकवेळा शासकीय दुकानातूनही ते नियोजितवेळी उघडले जात नाही. याकडे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.