रत्नागिरी नगर परिषदेने केली ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली

Share

१२२ मालमत्ता सील; १०८ नळजोडण्या तोडल्या

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने थकीत १२२ इमले आणि सदनिका सील केल्या. त्याचबरोबर १०८ नळ जोडण्या तोडल्या. चालू आणि थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ८ वसुली पथकांनी करवसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली. एकूण १४ कोटी रुपये मागणीपैकी तब्बल ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असल्याचे वसुली विभागाचे प्रमुख नरेश आखाडे यांनी सांगितले.

शहरामध्ये सुमारे २९ हजार मालमत्ता आहेत. थकीत मालमत्तांची करवसुली करण्यासाठी रनपने घरोघरी किंवा मालमत्ताधारकांकडे जाण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी पडणार असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून करवसुलीला प्राधान्य देण्यात आले.

मुख्याधिकारी तुषार बाबर यांनीही वसुली पथकासोबत जाऊन थकीत मालमत्ता कर भरण्याची विनंती केली. शहरातील २९ हजार मालमत्ताधारकांपैकी ज्यांचे कर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे होते त्यांच्याकडे वसुलीसाठी पथके जात होती. ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असून, अनेकांनी धनादेश दिले आहेत, ते बँकेत टाकून वटल्यानंतर ही करवसुली रक्कम वाढणार आहे.

Recent Posts

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

28 mins ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

1 hour ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

3 hours ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

4 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

5 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

5 hours ago