जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. आजपासून हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.
या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही, येथे त्यांचा पराभव झाला तर त्यांना मालिका देखील गमवावी लागेल. असे झाल्यास भारताविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये भारताने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून द. आफ्रिकन संघ आपल्या मालिकेतील आशा कायम ठेवू शकेल. आता उद्दिष्ट मोठे असताना कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरतो. पण, हे उद्दिष्ट पूर्ण होण्याआधी जोहान्सबर्गमधून येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्या…