मुंबई : राज्यात मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, नागपूरसह सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यंदा उशीरा पावसाला सुरुवात झाली असली तरी आता कोकण किनारपट्टी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात धो-धो पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसेच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास २० ते ३० मिनिटे उशीराने सुरु आहेत. वाशी, बेलापूर, खारघर, पनवेल परिसरात धुवांधार पाऊस कोसळला.
मागील काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…
मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…
मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…
मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात बरेली : काँग्रेस पक्षाचे 'राजपुत्र' राहुल गांधी यांनी 'भारत…
फोडाफोडीच्या राजकारणावर अजित पवारांचा सवाल पुणे : शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी,आम्ही केली की गद्दारी?…