नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार असून २० मार्चपर्यंत सुरू राहील.
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली. पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, “राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असे मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने २१ डिसेंबर रोजी मांडले होते.
“राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचे मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ जानेवारी ते २० मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे वेणुगोपाल यांनी सांगितले.
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींत…
देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर बोचरी टीका छत्रपती संभाजीनगर : देशभरात निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत…
पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा…
मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या…
जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…
कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…