नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आणि लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला योजनेबाबत मोठी घोषणा केली. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेवरील ३०० रूपयांची सबसिडी पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे. या निर्णयानंतर आता महिलांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या सबसिडीचा लाभ मिळेल. जाणून घेऊया मोदी सरकारने काय काय निर्णय घेतले.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या या निर्णयामुळे १० कोटी कुटुंबांना फायदा होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी यासंबंधी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की उज्ज्वला योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३०० रूपयांची सबसिडी आता ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली जाणार आहे.
पियुष गोएल म्हणाले की गुरूवारी कॅबिनेटमध्ये सहा निर्णयांवर मोहोर लागली. उज्ज्वला योजनेवरील सबसिडीमध्ये १ वर्षांची वाढ. याशिवाय कच्च्या जूयची कमीत कमी समर्थन मूल्य वाढवले.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना डीआरमध्ये १ जानेवारी २०२४ पासून चार टक्के वाढ करण्याचा घेण्यात आला.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…