नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आणि लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला योजनेबाबत मोठी घोषणा केली. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेवरील ३०० रूपयांची सबसिडी पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे. या निर्णयानंतर आता महिलांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या सबसिडीचा लाभ मिळेल. जाणून घेऊया मोदी सरकारने काय काय निर्णय घेतले.
कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या या निर्णयामुळे १० कोटी कुटुंबांना फायदा होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी यासंबंधी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की उज्ज्वला योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३०० रूपयांची सबसिडी आता ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली जाणार आहे.
पियुष गोएल म्हणाले की गुरूवारी कॅबिनेटमध्ये सहा निर्णयांवर मोहोर लागली. उज्ज्वला योजनेवरील सबसिडीमध्ये १ वर्षांची वाढ. याशिवाय कच्च्या जूयची कमीत कमी समर्थन मूल्य वाढवले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना डीआरमध्ये १ जानेवारी २०२४ पासून चार टक्के वाढ करण्याचा घेण्यात आला.