जगू कशी तुझ्याविना…
श्वास श्वास कोंडताना
साद न येई हाकेला
दूर जाता कलेवर
हुंदकाही अडलेला…
हात तुझा हातातला
सोडवेना सख्या मला
सनईच्या सूरातली
शांत झाली रागमाला…
दर्दभऱ्या एकांताच्या
राती कितीक झेलल्या
ओघळत्या आसवांनी
माझ्या पापण्या गोठल्या…
मुकपणा विरलेले
शब्द होते सोबतीला
उजागर झुल्यावर
पीळ बसतो मनाला…
सांगूनिया जा मजसी
असा काय माझा गुन्हा
परतीच्या पावलांनी
रंग भरावे तू पुन्हा…
संकटाच्या वादळाचा
ढग अंगावर आला
जगू कशी तुझ्याविना
पूर अश्रूंचा वाहिला…
– पूजा काळे, बोरिवली
नवचैतन्ये वसंत नटला
तरुवेलींचा सुगंध सुटला ||धृ||
बहावा तरी सुंदर सजला
पर्णपाचुतुनी.बहरु लागला
पीतफुलांनी डोलत सुटला
पांथस्थांना सुखवु लागला ||१||
गुलमोहराच्या पायघड्यांनी
रस्ता सारा मखमली बनला
रक्तवर्ण हा तळपू लागला
ग्रीष्मासंगे फुलून आला ||२||
पळस,पांगिरा फुलांनी नटला
हिरव्या कोंदणी ठसा उमटला
मनासी वेधत खुलवू लागला
संगतीने ग्रीष्मात हरवला ||३||
आम्रतरुही मोहोरुनी गेला
कैरीफळांचे तोरण ल्याला
कोकिळ कूजनी रंगुन गेला
आमराईचे भूषण बनला ||४||
– दीप्ती कोदंड-कुलकर्णी, कोल्हापूर.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्या…
'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…
मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…