पेंग्विन आठवतात, पण लोकांची दुरवस्था दिसत नाही

Share

मुंबई : मुंबई महापालिकेचा अतिशय धिसाडघाईत कारभार सुरू असून महापालिकेत विरप्पन गँग कामाला आहे. या विरप्पन गँगने संपूर्ण महानगरपालिकेची वाट लावली आहे. यांना राणीच्या बागेतील पेंग्विन आठवतात, पण लोकांची दुरवस्था दिसत नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केली आहे.

उपनगरातील मलनिस्सारण केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंद असून येत्या तीन दिवसांमध्ये ते केव्हा सुरू होणार त्याची वेळ आम्हाला कळवावी, नाहीतर मग मात्र आम्हाला मनसेच्या स्टाइलने गोष्टी सरळ कराव्या लागतील, मग त्यात कोणत्या अधिकाऱ्याने मार खाल्ला तर त्याची जबाबदारी मनसेची नाही, असा इशाराही संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.

मलनि:स्सारण केंद्रावर बोलताना देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री परदेशात गेले. त्यांनी डोळे उघडावेत आणि मलजल प्रक्रिया केंद्राची काय अवस्था आहे ती त्यांनी पाहावी. येथील पाण्यावर प्रक्रिया होऊन ते समुद्रात सोडणे आवश्यक आहे. तसा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नियम आहे. पाण्याचा दर्जा तपासून ते स्वच्छ करून मगच ते समुद्रात गेले पाहिजे असा नियम आहे. हा नियम धाब्यावर बसवण्यात आला असून गेल्या दोन वर्षांपासून हे मलजल केंद्र बंद आहे, असे देशपांडे म्हणाले.

येथील अवस्था बिकट आहे. येथील सुरक्षा रक्षकांची अवस्थाही बिकट आहे. येथे साप फिरत असतात, कोल्हे येतात. त्यांना कुठली चौकीची व्यवस्थाही नाही. बाजूलाच डम्पिंग ग्राउंड आहे. तेथून चोर येथे घुसतात आणि केबल कापून टाकतात. त्यामुळेच या केंद्रामधील कोणत्याही मशीन सुरू नाहीत. ज्या महानगरपालिकेचा ३६ हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे, त्या पालिकेची जर अशी अवस्था असेल तर आपण विकासाच्या गप्पा या कोणासाठी मारायच्या आणि कशासाठी मारायच्या असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

पर्यावरणमंत्र्यांची समस्या ही पार्टी, स्वित्झर्लंड, स्कॉटलँड येथे जायचे, तिथे पुरस्कार घ्यायचे आणि शो शायनिंग करत फिरायचे. प्रत्यक्षात काय होत आहे कोण पाहणार. त्यामुळे जरा पर्यावरण मंत्र्यांनी वेळ मिळाल्यास एकदा डोळे उघडून पर्यावरणाकडे पाहावे, अशी आमची त्यांना विनंती आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

पूर्व मुंबई उपनगरातील मुंबई महानगरपालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प दोन वर्षापासून बंद आहे. सांडपाणी हे विनाप्रक्रिया समुद्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री असून त्यांच्याच विभागात हा प्रकार सुरू असल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकल्पाला भेट दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्विझर्लंड, स्कॉटलांडमध्ये फिरायचं आणि अवॉर्ड घ्यायचे पण स्वतःच्या विभागाकडे दुर्लक्ष करायचं. पार्ट्या करण्यापेक्षा त्यांनी याठिकाणी डोळे उघडे ठेवून बघावं म्हणजे परिस्थिती लक्षात येईल, असे आरोप करत संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

46 mins ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

2 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

2 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

3 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

3 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

3 hours ago