PBKS vs MI: मुंबईचा ९ धावांनी रोमहर्षक विजय, पंजाबला त्यांच्यात घरात हरवले

Share

मुंबई: मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सला ९ धावांनी हरवले. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या जबरदस्त अर्धशतकामुळे मुंबईला मोठा स्कोर गाठता आला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरूवात खराब झाली.

कारण जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्जीने आपल्या स्पेलमध्ये घातक गोलंदाजी करताना पंजाबचा स्कोर ४ बाद १४ असा केला होता. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाची पहिली फळी पूर्णपणे कोसळली होती. जसप्रीत बुमराहने सामन्यात ३ विकेट घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

पंजाबकडून सर्वाधिक धावा आशुतोष शर्माने बनवल्या. आशुतोषने २८ बॉलमध्ये ६१ धावा ठोकल्या होत्यात. यात २ चौकार आणि ७ षटकारांसाह समावेश आहे. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

शेवटच्या ६ षटकांत पंजाब किंग्सला विजयासाठी ६५ धावा हव्या होत्या. मात्र त्यांच्या हातात केवळ ३ विकेट होत्या. दुसऱ्या बाजूला आशुतोष शर्मा क्रीझवर टिकून होता. तो तुफानी अंदाजात फलंदाजी करत होता. १६व्या षटकांत त्यांनी २४ धावा काढल्या. यावरून सामना फिरला. आता पंजाबला २४ बॉलमध्ये २८ धावांची गरज होती. १८व्या षटकांत आशुतोषची विकेट पडली. शेवटची २ षटके बाकी होती तेव्हा पंजाबला २३ धावांची गरज होती. जेव्हा हरप्रीत ब्रार २० बॉलमध्ये २१ धावा करून बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तर रबाडा बाद होताच पंजाबचा संघ १८३ धावांवर ऑलआऊट झाला.

Recent Posts

Chandrashekhar Bawankule : भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टेपणा!

सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…

12 mins ago

Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; ‘या’ ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…

20 mins ago

Beed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…

46 mins ago

Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली…

1 hour ago

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

2 hours ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

3 hours ago