अहमदाबाद : गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड वाघ बकरी (Gujarat Tea Processors & Packers Ltd. Wagh Bakri tea) या प्रतिष्ठित चहा ब्रँडचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी अहमदाबाद (Ahmedabad) येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. पराग यांच्यावर काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पराग यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराजवळील इस्कॉन रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, तेव्हाच त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. ते चालत असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांनी (Dog Attack) त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.
पराग यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटर (Ventilator) वर ठेवण्यात आलं होतं. मात्र, डोक्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली आणि काल रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू आधी सात दिवस ते व्हेंटीलेटरवर होते.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधूल एमबीएची पदवी घेतलेले पराग देसाई हे वाघ बकरी चहा व्यवसायातील चौथी पिढी होते. चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत त्यांनी ब्रँडला एका उंचीवर नेलं होतं. सध्या ते कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने वाघ बकरी कंपनीवर शोककळा पसरली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…
सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…
प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…
मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…
मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…