सातारा : पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दारु पितात, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. मात्र, आता बंडातात्यांनी जाहीर माफी मागितली आहे.
मीडियासमोर येऊन बंडातात्यांनी आपले विधान मागे घेतले आणि पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली. तसेच, पंकजा मुंडे आणि सुप्रियाताई या निर्व्यसनी, सदाचारी आहेत, असे बंडातात्या म्हणाले. सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. काही ऐकीव माहितीच्या आधारे मी ते विधान केले. माझ्या मनात त्यांच्याविरोधात काहीच मत नाही. त्या दोघींना भेटून दिलगीरी व्यक्त करणार आहे, असे बंडातात्या म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सुप्रिया आणि पंकजा यांना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागतो. माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही ते म्हणाले.
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…
मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या…