ICC Rankings: आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मोठा झटका

Share

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक २०२३ दिमाखात उंचावला. भारताने या सामन्यात श्रीलंकेला १० विकेटनी हरवले. मात्र या विजयानंतरही भारताला आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत(icc  ranking) मोठा झटका बसला आहे. खरंतर, पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल संघ ठरला आहे.

आशिया चषकच्या सुपर ४मध्ये सगळ्यात खाली राहणाऱ्या पाकिस्तानने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली. पाकिस्तानला द. आफ्रिकेच्या विजयाने मोठा फायदा झाला. ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात खेळवलेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेने १२२ धावांनी शानदार विजय मिळवत एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन असलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले आणि पाकिस्तान पुन्हा एकदा नंबर वन बनण्यात यशस्वी ठरला.

दुसऱ्या स्थानावर आहे भारत

टीम इंडिया आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडे ११४.६५९ पॉईंट आहेत. तर पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या संघाकडे ११४.८८९ रेटिंग आहेत. आशिया चषकानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला या क्रमवारीत नंबर वन बनण्याची संधी आहे. तसेच या मालिकेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा नंबर वन बनू शकतो.

इतर संघाचे हे स्थान

एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान नंबर वन, भारत दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा संघ ११३ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय द. आफ्रिका १०६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर तर इंग्लंड संघ १०५ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

53 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

1 hour ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

6 hours ago