‘मोदींवर टीका करण्याची कुणाच्याही औकातीत नाही’

Share

सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना ठणकावले

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. काँग्रेसने या प्रकरणी सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांच्या निलंबनाची मागणी केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच सभागृहात ‘मोदी चोर है’ ची जोरदार नारेबाजी केली. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींचा असा अवमान सहन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना २३ कोटी मतदारांनी निवडून दिले आहे. हे कुणाच्याही औकातीत नाही. मोदी कुणाच्या भीकेवर पंतप्रधान झाले नाहीत. त्यामुळे पळपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणणे सहन करणार नाही, असे सुधीर मुनगंटीवर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा नामोल्लेख टाळत म्हणाले. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याची कृती सभागृहात घडली. पण सभागृहात देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हटले गेले, अशी बाबही त्यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

आशिष शेलार यांनीही साधला विरोधकांवर शरसंधान

भाजप आमदार आशिष शेलार यांनीही या प्रकरणी विरोधकांवर शरसंधान साधले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारीच या प्रकरणी सभागृहात निवेदन केले होते. असे प्रकार यापुढे सत्ताधाऱ्यांकडून होणार नाही अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली होती. त्यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यावर आमची काहीही हरकत नाही. पण ते नेहमीच मुख्यमंत्री व सहकारी आमदारांवर खोके-बोके म्हणून टीका करतात. हे कोणत्या नियमात बसते, असे ते म्हणाले.

Recent Posts

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

48 mins ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

2 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

3 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

4 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

9 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

9 hours ago