मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आला आहे.
मनसेने या वादात आघाडी घेत शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे. प्रबोधकारांचा पुळका आलेल्या शिवसेनेला पालिकेत १५ वर्षे सत्ता उपभोगताना त्यांची आठवण का झाली नाही? असा सवाल मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी केला. तसेच प्रबोधकारांचा अर्धपुतळा महापालिकेच्या सभागृहात बसवावा, असा प्रस्ताव मनसेने मांडला होता; मात्र त्या वेळी अपुऱ्या जागेचे कारण देऊन पुतळा शक्य नसल्याचे सांगत कदम यांची मागणी शिवेसनेने मुद्दाम रोखून धरली असल्याचे मनसेचा आरोप आहे.
शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेने तैलचित्राचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर करून मनसेवर कुरघोडी केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यामुळे शिवसेने संकल्पना चोरल्याचा आरोप मनेस चेतन कदम यांनी केला.