Home देश रोहिंग्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये हात : स्यू की

रोहिंग्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये हात : स्यू की

0

गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे.

नवी दिल्ली- गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था व स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जगाच्या निंदेला आम्ही घाबरत नाही, अशी ठाम भूमिका म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी मांडली आहे.

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविरोधात तेथील लष्करानं धडक कारवाई सुरू केली असून त्यामुळे हजारो रोहिंगे शेजारच्या देशात पलायन करत आहेत. या घटनाक्रमानंतर जागतिक मानवी हक्क संघटनांसह काही देशांकडून म्यानमार सरकारवर टीकेचा भडिमार होत आहे. या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य केलं. गेल्या वर्षभरापासून मुस्लिम कट्टरपंथीयांकडून पोलीस ठाण्यांना लक्ष्य केले जात आहे.

आताचा हिंसाचार २५ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यावर रोहिंग्या मुसलमानांनी केलेल्या हल्ल्यामुळंच भडकला आहे. अनेकांची घरंही जाळण्यात आली. त्यामुळे रोहिंग्या साल्वेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले, असे स्यू की म्हणाल्या. म्यानमारमध्ये मानवी हक्कांच्या पायमल्ली होत असेल तर ते चिंताजनक आहे. मात्र, एका घटनेवरून म्यानमारबद्दल रंगवले जाणारे चित्र चुकीचे आहे. जगाने एका छोट्या भागातील हिंसाचारावरून म्यानमारचे मूल्यमापन करू नये. म्यानमारकडे देश म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंसाचारानंतर ज्यांना आपली घरे सोडावी लागली, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. देशात परतण्याची इच्छा असलेल्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये आजही अनेक गावांमध्ये मुस्लिम राहत आहेत. हिंसाचारानंतरही त्यांनी आपली गावं, घरं सोडलेली नाहीत. हवे असल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. आम्ही घाबरत नाही, असे त्या म्हणाल्या.

[EPSB]

अखेर शिवसेनेची म्याँव म्याँवच

कोणतीही संघटना असो, पक्ष असो, तो एक खांबी तंबू ठरला तर खांब कोसळल्यानंतर जी वाताहात होते,

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version