पाचराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानोत्तर जनमत चाचण्यांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली व मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने हे आदेश दिले. तसेच मतदानानंतर मतदारांच्या मुलाखती प्रसारित करण्यास वृत्त वाहिन्यांना बंदी घातली आहे.
११ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते चार डिसेंबर साडेपाचपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.