कर्जत तालुक्यात मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाई जास्त जाणवत आहे.
कर्जत तालुक्याचा अर्धा भाग आदिवासी आणि दुर्गम भागात वसला आहे. त्यात तालुक्यातून वाहणा-या नद्या उन्हाळ्यात कोरडया असतात. तालुक्यातील मोठी लोकवस्ती ही दुर्गम भागात वसली असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावते.
ही टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात एप्रिल २०१६ पासून १४ गावे आणि ३४ आदिवासी वाडयांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मागील ही संख्या १० गावे आणि ३१ आदिवासी वाडया इतकी होती.