भारतातील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ करण्याचा भाग म्हणून मतदार यादीतील दोष दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत.
‘निवडणूक सुधारणा’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही मतदारयादी ‘आधार’ क्रमांकाला जोडण्याचे काम हाती घेतले आहे. यंदा हे काम नक्कीच पूर्ण होईल. ते झाल्यानंतर मतदारांची बायोमॅट्रिक माहिती असलेला भारत हा जगातील पहिलाच देश बनेल. त्यानंतर निवडणुकीच्या काळात कोणताही गैरव्यवहार होणार नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.
मतदारयादीत आपले नाव दोन वेळा येणार नाही, याची काळजी मतदारांनी घ्यावी. एकाच मतदाराचे नाव दोनदा आढळल्यास त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. मतदारयादी आधारला जोडल्यानंतर मतदारांना आपला पत्ता ऑनलाईन कधीही बदलता येऊ शकतो.