नवाबचे दाऊदशी, तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध

Share

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तींशी संबंध तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला आहे.

पाकिस्तानातून आलेल्या कसाबशी झुंज देताना, पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा मृत्यू झाला होता. कसाबने तर गोळ्या घातल्याच, पण करकरेंनी जे बुलेटप्रुफ जॅकेट घातले होते. ते बोगस होते. बिमल अग्रवाल यांच्या कंपनीने हे जॅकेट पुरवले होते. याच बिमल अग्रवाल यांच्याशी श्रीधर पाटणकरांचे व्यावसायिक संबंध असून, पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि परिवाराचे व्यावसायिक संबंध असलेल्यांनी हेमंत करकरेंची हत्या केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महाराष्ट्राची जनता विचारत आहे, सांगा ठाकरे पार्टनर कोणाकोणाचे? पुढचे एपीसोड मी हळूहळू महाराष्ट्रासमोर मांडणार आहे. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे, श्रीधर पाटणकर, हे लोक कोणाकोणाचे पार्टनर आहेत? ते लवकरच मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. ठाकरे यशवंत जाधवचे पार्टनर की नंदकिशोर चतुर्वेदी हवाला एन्ट्री ऑपरेटरचे आहेत, असे सोमय्या यावेळी म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले, “मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचं कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहे.”

“हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेट प्रुफ जॅकेट नकली असल्याने झाला. त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या. विमल अग्रवालला अटक झाली,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“ज्या विमल अग्रवालला बोगस बुलेटप्रुफ जॅकेटप्रकरणी अटक झाली त्याचं नाव यशवंत जाधववर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं. यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ आहेत. जाधवांनी एक हजार कोटी रुपयांची माया जमवली आहे,” असाही आरोप सोमय्या यांनी केला.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

12 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

13 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

14 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

14 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

14 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

15 hours ago