कल्याण (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या ३५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुर्गाडी किल्ला, कल्याण येथे स्मारक स्वरूपात भारतीय नौदलाची युद्धनौका टी-८० विराजमान करण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी गुरुवारी सामंजस्य करार केला. टी-८० स्मारक हे आता एसकेडीसीएल च्या नदी किनारा विकास प्रकल्पातील आरमार स्मारकाचा भाग असेल.
लवकरच प्रेक्षकांसाठी निर्माण होणारे हे आरमार स्मारक प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास दर्शवेल. तसेच कायमस्वरूपी सार्वजनिक प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृती आणि मल्टिमिडीयाच्या रूपात मांडले जातील. नियोजनाच्या टप्प्यापासूनच हा प्रकल्प भारतीय नौदलातील अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागासह विकसित केला गेला आहे.
कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…
विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…
विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…