सर्वसामान्य मुंबईकरही करू शकतील एसी लोकलने प्रवास

Share

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांना लोकलसेवा १५ ऑगस्टपासून काही अंशी सुरू करण्यात आली आहे. पण आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने इतरांनाही प्रवासाची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात येते.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या काळात लोकलसेवा बंद करण्यात आली होती नंतर ती हळूहळू सुरू करण्यात आली. लोकलसेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. अशातच एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना आता एसी लोकलचा प्रवास सुकर होईल. प्रवाशांना तिकीट दरातील तफावत अदा करून या गाडीतून प्रवास करता येईल.

एसी लोकलमधील प्रवासीसंख्या वाढविण्यावर रेल्वेचा भर आहे. त्यानुसार विविध प्रस्तावांवर विचार सुरू आहे. जेव्हा प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात होईल, तेव्हा या तिकीटदराबाबत विचार करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सर्वच गाड्या होणार वातानुकूलित?

मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची योजना आखली जात आहे. सर्व उपनगरी गाड्या लोकल वातानुकूलित म्हणजे एसी करण्याचाही रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणानं मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय याआधीच घेतला आहे. एसी लोकल करण्याबाबत याआधीपासूनच विचार सुरू होता. पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकूलित करण्याची तयारी केली जात आहे.

Recent Posts

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…

13 mins ago

पुढच्यास ठेच; पण मागचा शहाणा झाला?

मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…

43 mins ago

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…

2 hours ago

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

4 hours ago

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…

4 hours ago

Rohit Sharma: आयुष्यात आधीही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

6 hours ago