मुंबई (प्रतिनिधी): कोविड काळात मुंबई महापालिकेकडून कोविड घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोविड काळातील अधिकाराचा वापर करून शिवसेना नेते आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये कोविडचे कंत्राट मिळवण्याची स्पर्धा सुरू होती असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज यांनी कोविड काळातील १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या आणि वडीलांच्या तसेच मित्रांच्या कंपन्यांमध्ये मिळवले आहे. मनीष वाळुंज हे कुर्ला एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त होते; सध्या ते भायखळा येथील सहाय्यक आयुक्त आहेत. तर मनीष यांचे वडील राधाकृष्ण वाळुंज यांनी २१ ऑगस्ट २०२० रोजी जेनेहेल्थ डायग्नोस्टिक प्रा. लि. कंपनीची स्थापना केली होती. मात्र या कंपनीला अवघ्या काही दिवसांत ३० कोटींहून अधिक रक्कमेचे टेंडर दिले. यात आरटीपीसीआर, कोविड टेस्टिंग हे काम नवीन सुरू झालेल्या कंपनीला देण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
तर १८ जून २०२१ रोजी जेनेसी डायग्नोस्टिक या कंपनीची स्थापना केली. या कंपनीला देखील मोठमोठे कोविडचे टेंडर देण्यात आले. यात आरटीपीसीआर टेस्ट, अॅन्टीजेन टेस्ट, स्वॅब टेस्ट अशा अनेक ऑर्डर या कंपनीला मिळायला लागल्या. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या नवीन असून या व्यवसायाचा त्यांना अनुभव नाही किंवा ते वैद्यकीय तज्ज्ञ देखील नाही. अशाच पद्धतीने कोविड काळातील अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट पालिका अधिकारी व सत्ताधारी राजकीय नेत्यांचे नातेवाइक मित्रपरिवार यांना मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान अशा प्रकारच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली असून मनीष वाळुंज यांच्या संबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही सोमय्या यांनी केली आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…
मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…
SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…