नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच निवडणूक आयोगामध्येही (Election Commission) अनेक बदल केले जात आहेत. त्यात निवडणूक आयोगाने आज सोमवारी गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवले आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस प्रमुख यांना देखील हटवले आहे. विशेष बाब म्हणजे यात बृहन्मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश दिले आहेत.
चहल यांची बदली करण्यात आली आहे. चहल यांची बदली रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मागणी करण्यात आली होती. पण राज्य सरकारच्या मागणीला निवडणूक आयोगाने धुडकावून लावले.
राज्य सरकारकडून आयुक्त इक्बाल चहल यांची बदली टाळण्यासाठी तीन वर्षांचा नियम लागू करु नये, अशी मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.
अर्थातच राज्य सरकारची ही मागणी फेटाळल्यामुळे आता मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि दुसऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी पदांवर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला आहे. या नियमांतर्गत मुंबई महापालिकेच्या इतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखिल होणार आहेत.
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्या…