नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या भारतीय उत्पादकांची भेट घेतली. भारताने १०० कोटी लसीकरण करून महत्वाचा टप्पा पार केला. या यशोगाथेत या लस उत्पादकांनी मोठी भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मेहनतीचे आणि साथीच्या काळात दिलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक मोदींनी केले. जागतिक स्तराला सुसंगत अशा वैद्यकीय पद्धतींमध्ये सुधारणा करण्याची ही एक संधी आहे, असे ते म्हणाले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिज्, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासिया बायोटेक या सात लस निर्मात्यांचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हेही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला आणि सायरस पूनावाला यांनी सरकारने आणलेल्या नियामक सुधारणांची प्रशंसा केली. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सज्ज होण्यासाठी लस उत्पादकांनी सतत एकत्र काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…
मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…
DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…
महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…
मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…
मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…