मोदी है तो मुमकीन है : ‘मथुरा-काशीच नव्हे तर देशातील ४० धार्मिक स्थळे मुक्त करण्याची तयारी’

Share

विश्व वैदिक सनातन संघाचा दावा

नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसातच उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील कृष्णजन्मभूमीचा वाद न्यायालयात सुरू आहे. वाराणसीच्या काशी-ज्ञानवापी प्रकरणातही कोर्टात सुनावणी सुरू आहे. यासह मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचा मुद्दाही न्यायालयात आहे. अशात आता हिंदू संघटनांनी अशी ४० प्रकरणे न्यायालयात नेण्याची तयारी केली आहे. येत्या २०२४ मध्ये वसंत पंचमीच्या मुहूर्तावर याची सुरुवात केली जाईल, असा दावा विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह विसेन यांनी केला आहे. जितेंद्र सिंह यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. तर आता अन्य ४० धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी एकाचवेळी न्यायालयीन/संवैधानिक धार्मिक युद्धाची तयारी पूर्ण झाली आहे.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद खूप जुना आहे. हा वाद १३.३७ एकर जमिनीवरील मालकी हक्काशी संबंधित आहे. १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला होता. या करारात १३.७ एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. श्री कृष्ण जन्मस्थानकडे १०.९ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे आणि शाही इदगाह मशिदीकडे २.५ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे.

शाही इदगाह मशीद बेकायदेशीर अतिक्रमणातून बांधण्यात आल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. या जमिनीवर त्यांचा दावा आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीनही श्रीकृष्णाच्या जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंच्या बाजूने होत आहे. या प्रकरणी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि दिल्ली निवासी उपाध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यामध्ये १३.३७ एकर जागेवर बांधलेले भगवान कृष्णाचे मंदिर पाडून मुघल सम्राट औरंगजेबने ईदगाह बांधल्याचे म्हटले होते.

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद यांच्यात जसा वाद होता, तसाच ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरातही वाद आहे. स्कंद पुराणात नमूद केलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ हे सर्वात महत्वाचे हिंदू धार्मिक स्थळ मानले जाते. १९९१ मध्ये, काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांचे वंशज पंडित सोमनाथ व्यास, संस्कृतचे प्राध्यापक डॉ. रामरंग शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली.

याचिकेत दावा करण्यात आला होता की, काशी विश्वनाथचे मूळ मंदिर २०५० वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधले होते. १६६९ मध्ये औरंगजेबाने ते पाडून त्या जागी ज्ञानवापी मशीद बांधली. ही मशीद बांधण्यासाठी मंदिराचे अवशेष वापरले गेले. येथील ज्ञानवापी मशीद हटवून संपूर्ण जमीन हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी हिंदू बाजूची मागणी आहे.

हिंदू भोजशाळेला वाग्देवीचे म्हणजेच सरस्वतीचे मंदिर मानतात, तर मुस्लिम या परिसराला कमल मौला मशीद म्हणतात. यावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. राजा भोजच्या नावावरून भोजशाळेचे नाव पडले आहे. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारे संरक्षित एक स्मारक आहे.

Recent Posts

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

2 hours ago

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

3 hours ago

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

3 hours ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

4 hours ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

4 hours ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

6 hours ago