Measles outbreak : कोरोनानंतर महाराष्ट्रावर ‘गोवर’चे संकट

Share

मुंबई : कोरोनाचे आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक (Measles outbreak) होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

प्रामुख्यानं लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवर आजाराचं प्रमाण वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ७१७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३०३ प्रकरणं मुंबईत आढळून आली आहेत. आतापर्यंत या आजारानं महानगरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.

गोवर हा एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. हा आजार सहसा फक्त मुलांमध्ये होतो. त्यामुळं २८ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई स्थानिक संस्थेच्या बुलेटिननुसार, मंगळवारी मुंबईत गोवरच्या पाच नवीन रुग्णांची नोंद झालीय. संशयित आजारानं एकाचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.

या वर्षी जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ७० आणि मुंबईजवळील भिवंडीमध्ये ४८ रुग्ण आढळले आहेत. या वर्षात आतापर्यंत मुंबईत गोवरच्या प्रादुर्भावाचे ७४ रुग्ण आढळले आहेत.

हे पण वाचा …

गोवरचा धोका कायम

मुंबई, भिवंडी आणि मालेगाव गोवरचे हॉटस्पॉट

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

53 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

1 hour ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

6 hours ago