नाशिकसह महाराष्ट्रातील हजारो मराठा शिवसैनिकांचे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद
नाशिक : गेली चाळीस वर्षे संघर्ष केल्यानंतर तसेच दोनदा न्यायालयीन लढाईत रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या (Maratha Samaj)भावनांना न्याय दिला या शब्दात नाशिक (Nashik) शिवसेना सहसंपर्कप्रमुख व छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून हजार पेक्षा अधिक तर महाराष्ट्रातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित हजारो शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
“एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली आहे. या निर्णयामुळे कुणबी वगळून उर्वरित मराठा समाजालाही न्याय मिळणार आहे.”