नागपूर : विधान परिषदेतील (Vidhan Parishad) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. यानंतर मंगलप्रभात लोढा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करत नसल्याचे तसेच जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, असे जाहीर आव्हान लोढा यांनी दिले आहे.
अंबादास दानवे यांनी देखील आपण पुरावे सादर करत असल्याचे जाहीर करत, प्रतिआव्हान दिले. यावर विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कुणी राजीनामा बाहेर काढत नाही, पण लोढासाहेब तुम्ही राजीनामा बाहेर काढलात. तुम्ही राजीनामा देवू नका. तसेच काही आमदार केवळ खिशात राजीनामा घेऊन फिरतात, मात्र कुणीच राजीनामा देत नाही, असा टोमणाही लगावला.
अंबादास दानवे म्हणाले, “मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या”, असे अंबादास दानवे म्हणाले. यानंतर लोढा यांचे नाव आपण मागे घेत असल्याचे दानवे म्हणाले. पण लोढा यांचे नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या.
दानवे म्हणाले, “भाजपचे एक नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचे अनेक ठिकाणी महापालिकेने अवैध बांधकाम, त्याची विक्री चालू आहे. भाजप उघड्या डोळ्याने हे बघत आहे. त्यांच्याविरोधात आमच्याकडे तक्रारी येत आहेत त्या तक्रारी मी तुमच्याकडे पाठवतो तुम्ही याबाबत निर्णय घ्या”, असे दानवे उपसभापती नीलम गोऱ्हेंना म्हणाले.
अंबादास दानवेंनी आरोप केल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत राजीनाम्याचे पत्र काढले. तसेच १० वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून आणला आहे. एकही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा मी गैरवापर करत नाही, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.
यावर “मंगल प्रभात लोढा तुम्ही राजीनामा देऊ नका. अंबादास दानवे यांचे जे आरोप आहेत ते संबंधित यंत्रणेला पुरावे सादर करतील,” असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुंबई: एअरटेलच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान असतात. यात विविध किंमती आणि फीचर्स असतात. आज…
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची…
लवकरच होणार घोषणा ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार…
धुळे : काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडल्याची…
मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लागणाऱ्या तीव्र…
जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…