ममतांनी ठरवला हायकोर्टाचा आदेश बेकायदेशीर; भाजपाने केली त्यांच्या राजीनाम्याची मागणी

Share

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की, २०१६च्या डब्ल्यूबीएसएससी भरती पॅनेल रद्द करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित शाळांमधील २५ हजार हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बुडाल्या. हा आदेश बेकायदेशीर आहे आणि आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे बॅनर्जी यांनी पूर्व सिंगभूममधील चकुलिया येथे निवडणूक प्रचाराला संबोधित करताना सांगितले.

डिव्हिजन बेंचने निर्णय दिल्यानंतर काही तासांनी, न्यायालयाने सीबीआयला नियुक्ती प्रक्रियेच्या तपशिलांची चौकशी करून तीन महिन्यांत या न्यायालयाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपा नेते न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला. तसेच पगार परत करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावरही ममतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ममता पुढे म्हणाल्या की, “काळजी करू नका. सरकारकडे एक लाखाहून अधिक नोकऱ्या रिक्त आहेत.”

कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि आता तमलूकमधील भाजपाचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांनी टीएमसी मंत्रालयाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच बेकायदेशीर नियुक्त्या झाल्या आहेत. यामुळे भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य समिक भट्टाचार्य यांनी ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Recent Posts

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

29 mins ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

1 hour ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

3 hours ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

4 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

5 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

5 hours ago