बड्या बांधकाम व्यावसायिकांचा ३,३३३ कोटींचा गैरकारभार उघडकीस

Share

नाशिक : आयकर विभागाच्या पथकाने नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर गेले सहा दिवस छापे टाकले. २० एप्रिल रोजी पहाटे सहाच्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई २५ एप्रिलला संपली. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले, तर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आयकर विभागाची राज्यभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.

नाशिक शहरात बड्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरु असून त्यात लेखी उलाढाल फार कमी दाखवून दिशाभूल केल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला. नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होते. कुणालाही संशय येऊ नये, यासाठी अधिकारी वेगवगेळ्या ठिकाणाहून कारमधून दाखल झाले. ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांकडून बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकण्यात आले.

दरम्यान नाशकातीलच काही पथकांनी ईगतपुरी शहरात एका बड्या लाॅटरी व्यावसायिकाकडे छापा टाकला असता सुमारे ७० ते ८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

Recent Posts

पुढच्यास ठेच; पण मागचा शहाणा झाला?

मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…

19 mins ago

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…

1 hour ago

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

4 hours ago

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…

4 hours ago

Rohit Sharma: आयुष्यात आधीही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

6 hours ago

Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…

6 hours ago