बेळगाव : राज्यात सीमावादाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कर्नाटकमधील (Karnataka) काही संघटनांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाहनांना काळे फासले. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकचे समर्थन करणाऱ्या काही संघटनांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वाहनांना अडवले. त्यांनी कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासले. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी तर वाहनांवर चढून आंदोलन केले.
कर्नाटकच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली जात आहे. सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमप्रश्न हाताळता येत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकून केली जात आहे.
आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात…
मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास प्रचंड शक्तिप्रदर्शनासह डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कल्याण…
मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…
भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा नवी दिल्ली : लोकसभा…
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या चार उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले…