भोपाळ: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबतचा सस्पेन्स सोमवारी ११ नोव्हेंबरला अखेर संपला. उज्जैन दक्षिण येथील भाजप आमदार मोहन यादव यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांच्या जागी मध्य प्रदेशची कमान भाजपने मोहन यादव यांच्याकडे सोपवली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या गोष्टी
मोहन यादव मध्य प्रदेशच्या उज्जैन दक्षिण येथून सलग तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उज्जैन दक्षिण येथून काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांना १२ हजार ९४१ मतांनी हरवले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मोहन यादव यांना ९५ हजार ६९९ मते मिळाली होती.
मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री निवडीमागचे कारण म्हणजे ओबीसी समाजातील ेते. तेथे ओबीसीची लोकसंख्या ४८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भाजप २००३ नंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी नेत्यांसोबत गेली आहे.
मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यांनी १९९३ ते १९९५ पर्यंत आरएसएससाठी काम केले आहे. यादव माधव विज्ञान महाविद्यालय छात्रसंघाचे सह सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनचे नगर मंत्री राहिले आहेत.
मोहन यादव यांचे कोणत्याही वादात नाव आलेले नाही. याशिवाय ते मध्य प्रदेश सरकारमध्ये २०२० ते २०२३ दरम्यान शिक्षण मंत्री राहिले आहेत. त्यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी एमबीए आणि पीएचडी केली आहे.
मोहन यादव यांनी १९९७मध्ये भाजपमध्ये येत राजकारणाला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. भाजपने या राज्यात २३० जागांपैकी १६३ जागांवर विजय मिळवला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…
मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…
SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…