मुंबई : परळ परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायूगळती झाली. या वायूगळतीमुळे पाईपलाईन असलेल्या भागातील रस्त्यावर आग लागली. आगीच्या ज्वाळा जमिनीतून बाहेर निघत होत्या. येथून काही अंतरावरच एक पेट्रोलपंप आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाच अग्निशमन दलाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, संपूर्ण गॅसच्या पाईलपाईनला आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.
हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. गॅस पाईपलाईनला आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरु केले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाईपलाईनमधून वायूगळती सुरु असल्याने ही आग विझताना दिसत नाही. अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून पाईलपाईनजवळ जाऊन आग विझवताना दिसत आहेत. ही आग आणखी भडकू नये, यासाठी त्यावर सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. याठिकाणी आता फोम टँकर आणण्यात आला आहे. पाण्याने आग न विझल्यास फोमचा वापर करण्यात येईल.
सुरुवातीला याठिकाणी आगीच्या ठिणग्या पडत होत्या. त्यानंतर आग चांगलीच भडकली. वायूपुरवठा बंद न झाल्याने पाण्याचा जोरदार फवारा मारूनही ही आग विझत नव्हती. या काळात महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येणे अपेक्षित होते. परंतु, बराचवेळ उलटूनही महानगर गॅसचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील काही दुकानांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. आजूबाजूची काही दुकान बंद करण्यात आली आहेत.
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…
कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…
अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…