दुबई : सध्या सुरू असलेली टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा ही भारतीय संघासोबतची शेवटची स्पर्धा असल्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी म्हटले आहे. इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी ही माहिती दिली. जवळपास सात वर्षे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.
श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर भारताच्या प्रशिक्षण जर्सीमध्ये त्यांचा फोटो अपलोड केला. मी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून माझे अंतिम काम करणार आहे. मला २०१४ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाची सेवा करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. माझा विश्वास आहे, की मी माझे काम पूर्ण उत्कटतेने, प्रामाणिकपणे आणि माझ्या सर्वोत्तम क्षमतेने पूर्ण केले आहे. होय, अधूनमधून चुका झाल्या पण प्रत्येक चुकीचा फायदा संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी घेतला गेला, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले.
आर. श्रीधर यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी कर्णधार एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहलीसह त्यांचे सहकारी सदस्य आणि इतर खेळाडूंचे आभार मानले. रवी शास्त्री एक प्रेरणादायी गुरू आहेत, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. माजी कर्णधार धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांचेही खूप आभार, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असेही श्रीधर यांनी म्हटले.
२०२५ मध्ये सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : 'ओम फट् स्वाहा' म्हटलं की मराठी प्रेक्षकांना…
आमदार नितेश राणे यांची जहरी टीका मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी…
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन…
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीने पोलीस…
महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली घोषणा नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये…
ठाणे (वार्ताहर) : ठाणे येथील तीन हातनाका परिसरातील सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांनी ११ मार्चपासून ठिय्या…