मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.
या सर्वांवर विरोधकांकडून शिवसेनेवर टिका होत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.
२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस …की " वर्षा " तला शेवटचा दिवस ?!!
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 21, 2022
अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये, २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की “वर्षा” तला शेवटचा दिवस ?!!, विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांनीही असेच ट्विट केले आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 21, 2022