बँकॉक (वृत्तसंस्था) : थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारताने इतिहास रचला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार असून भारतासमोर इंडोनेशियाचे आव्हान आहे. स्पर्धेत ७३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी भारताने डेन्मार्कला ३-२ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या सामन्यात भारताची इंडोनेशियाशी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताचे पथक निश्चित झाले होते. भारतीय संघ पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेत पथकावर नाव कोरणार आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून लक्ष्य सेन मैदानात होता. त्याचा विक्टर एक्सेलसनविरुद्ध १३-२१, १३-२१ असा पराभव झाला. हा सामना ४९ मिनिटे चालला. दुसऱ्या सामना डबल्समध्ये खेळला गेला.
या सामन्यात सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने किम आस्त्रुप आणि मथियास क्रिस्टिएंसन जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१८, २१-२३, २२-२० असे पराभूत केले. तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात किदांबी श्रीकांतने आंद्रेस एंटोनसनला २१-१८, १२-२१, २१-१५ असे पराभूत केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…
पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…