तिरूअनंतपुरम: भारत(india) आणि नेदरलँड्स(netherlands) यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. खरंतर, याआधीही भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात पावसाने खोडा घातल्याने रद्द करावा लागला होता. यामुळे विश्वचषकाआधी भारताला रोहित शर्माच्या नेतृत्वात एकही सराव सामना खेळावयास मिळाला नाही. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे हा सामना खेळवला गेला नाही.
याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला. आता भारतीय संघ थेट विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबरला खेळवला जाईल. दोन्ही संघ चेन्नईत आमनेसामने असतील. दरम्यान, विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक अभियानाची सुरूवात केल्यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ ११ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघादरम्यान दुपारी दीड वाजल्यापासून सामन्याला सुरूवात होईल. याशिवाय भारतीय संघ बांगलादेश, इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. तर या स्पर्धेचा शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्यात उमेदवार उभा करुन मविआने अपमानच केला! संजय राऊतांनी पंतप्रधानांवरुन केलेल्या टीकेवर आमदार…
मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; काय होती चोरांची ट्रिक? मुंबई : हल्लीच्या जगात सायबर गुन्हेगारीत…
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बँकेचे शिपाई म्हणून करतात काम स्वतःचाच विक्रम मोडत पुन्हा एकदा रचला ‘गिनीज वर्ल्ड…
दोघांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर नाशिक : गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन…
शांघाय : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (Archery World Cup 2024) भारतीय पुरुष आणि महिला संघांनी भारताच्या…
२८ प्रवासी जखमी बुलढाणा : देशभरात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना अशातच बुलढाण्यामधून भीषण…