Archery World Cup : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला संघाला सुवर्णपदक

Share

शांघाय : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (Archery World Cup 2024) भारतीय पुरुष आणि महिला संघांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदके (Gold medals) जिंकली आहेत. चीनमध्ये शांघाय (Shanghai) येथे ही स्पर्धा पार पडली. तिरंदाजीत भारताचा नेम कोणी धरु शकत नाही, हे भारताच्या तिरंदाजांनी सिद्ध करुन दाखवले आहे.

भारतीय महिला कंपाउंड संघाने इटलीचा २३६-२२५ असा पराभव केला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर या भारतीय त्रिकूटाने सहाव्या मानांकित इटलीचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुष संघात अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश एफ यांनी नेदरलँड्सचा २३८-२३१ असा पराभव केला.

नेदरलँड संघात माइक श्लोसर, सिल पीटर्स आणि स्टीफ विलेम्स यांचा समावेश होता. सहा बाणांच्या पहिल्या सेटमध्ये ज्योती, अदिती आणि प्रनीत यांनी केवळ दोनदा १० गुण गमावले आणि या तिघांनी मार्सेला टोनिओली, इरेन फ्रँचिनी आणि एलिसा रोहनर या इटालियन त्रिकुटावर सुरुवातीला १७८-१७१ अशी आरामदायी आघाडी घेतली. शेवटी भारतीय खेळाडूंनी दोन गुण गमावले, परंतु त्याचा फारसा फरक पडला नाही आणि त्यांनी ११ गुणांच्या फरकाने सुवर्णपदक जिंकले.

चौथ्या मानांकित म्हणून पात्र ठरलेल्या पुरुष संघाने त्यांच्या डच प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. त्यांनी ६० च्या परिपूर्ण फेरीने सुरुवात केली आणि सहा बाणांच्या अंतिम सेटमध्ये दुसऱ्या परिपूर्ण ६० सह विजयावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी पुढील दोन बाणांमध्ये त्यांचे फक्त दोन गुण कमी झाले. त्यामुळे हा मोठा विजय ठरला.

Recent Posts

Job Recruitment : युवकांना भरघोस पगाराची नामीसंधी! ‘या’ विभागात रिक्त पदांची भरती

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी तसेच भरघोस…

10 mins ago

Air India News : प्रवाशांची गैरसोय! एअर इंडियाची चक्क ७० हून अधिक उड्डाणे रद्द

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? मुंबई : अलीकडे झालेले विस्तारा एअरलाइनवरील संकट निवळले नसून इतक्यात…

2 hours ago

BMC News : होणार कायापालट? बीएमसीतर्फे ‘या’ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

तब्बल १८८ इमारतींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : पावसाळा तोंडावर येताच मान्सूनपूर्व कामांना…

2 hours ago

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…

6 hours ago

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…

7 hours ago

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

14 hours ago