जकार्ता (वृत्तसंस्था) : भारताच्या हॉकी संघाने गुरुवारी कमाल करत इंडोनेशियाचा १६-० असा धुव्वा उडवला. या मोठ्या विजयामुळे भारताने पाकिस्तानला मागे टाकत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये प्रवेश केला.
भारताच्या हॉकी संघाने आशिया चषकातील आपल्या अखेरच्या पूल मॅचमध्ये इंडोनेशियाचा १६-० ने पराभव करून सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया २०२३ च्या विश्व चषकासाठी पात्र ठरलेत. तर यजमान म्हणून भारतही यासाठी पात्र ठरला आहे.
सुरुवातीच्या सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला होता. पण, पूल-एमध्ये जपानने पाकला ३-२ ने धूळ चारली. यामुळे भारतासाठी संधी निर्माण झाली. पहिल्या दोन्ही सामन्यांत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांत टीम इंडियाने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्याचा पाकसोबतचा पहिला सामना १-१ असा अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या सामन्यात जपानकडून ५-२ ने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.
CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…
NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…
मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…
Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…
पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections 2024) पुण्यातील मतदारसंघांत ७ मे आणि १३ मे…
काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…